दत्तप्रसाद शिरोडकर यांना,गुणवंत कामगार पुरस्कार

मुंबई :(विश्वनाथ पंडित ) जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, वृत्तपत्र लेखक दत्तप्रसाद रामचंद्र शिरोडकर यांना दिनांक ०९ फेब्रुवारी रोजी शासनमान्य महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने मिळणारा महाराष्ट्र राज्य "गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार २०१७"  कामगार मैदान येथे कामगार मंत्री माननीय दिलीप वळसे-पाटील यांच्या हस्ते शिरोडकर यांना प्राप्त झाला. सदर प्रसंगी कामगार राज्य मंत्री बच्चू कडू व प्रशासकीय अधिकारी श्रीमती विनिता सिंघल व कामगार आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर आदी मान्यवर उपस्थित होते. या आधीही दत्तप्रसाद शिरोडकर यांना त्यांच्या सामाजिक, वृत्तपत्र लेखनातील कार्यातील योगदानाबद्दल अनेक राज्यस्तरीय पुरस्कारानी सन्मानित करण्याहत आले असून मुंबई वृत्तपत्र लेखक संघाचा समाजरक्षक,मराठी पत्रलेखक संघ महाराष्ट्र यांचा समाजभूषण व महाराष्ट्र टाइम्स यांचा "सिटीझन रिपोर्टर"तसेच अनेक संस्थाचे राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. मुलुंड भांडुप आणि कांजूर भागात सुपरिचित असलेले दत्तप्रसाद शिरोडकर जाॅन्सन अॅंड जाॅन्सन येथे नोकरी करीत असताना गेली तीन दशके  नागरी समस्यां, वेदना, व्यथा यावर वृत्तपत्रांच्या माध्यमातून  सातत्याने लिखाण करीत असून, समाजात घडणाऱ्या घटना व स्थित्यंतरे या विषयावर त्यांची दोन काव्य संग्रह प्रसिद्ध झालेली असून कविता आणि साहित्य विश्वात सुद्धा त्यांनी आपला ठसा उमटवला आहे.अनेक सामाजिक  संस्थाशी त्यांचे खूप चांगले सहकार्य असून विविध सामाजिक कार्यात त्यांचा नेहमीच सहभाग असतो. त्यांच्या कामाची दखल म्हणून महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, महाराष्ट्र शासनाने त्यांची"गुणवंत कामगार २०१७" साठी निवड केली आहे. हा शासकीय कार्यक्रम करोनाचे सर्व नियम पाळून खूप मोठ्या दिमाखात कामगार मैदान हुतात्मा बाबू गेनू मार्ग येथे कामगार कल्याण मंडळ यांच्या प्रांगणात पार पडला या निमित्ताने राज्यातील विविध जिल्ह्यातील गुणवन्त कामगार उपस्थित होते.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट