नामदेव समाजन्नोती परिषद पुणे शहर शाखेतर्फे देवदासी, पोतराज व गोंधळी यांना धान्य कीट वाटप

पुणे (प्रतिनिधी)  कोरोनाच्या महामारी पार्श्वभूमीवर लाॅकडाॅनच्या काळात दुर्लक्षित असलेला देवदासी, पोतराज व गोधंळी समाज यांच्या हाताला आजही काहीच काम मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. आता सर्वांचे मदतीचे हात थकलेले असताना नामदेव समाजोन्नती परिषद, पुणे शहर अध्यक्ष संदिप लचके यांचे संकल्पनेतून नामदेव समाजोन्नती परिषद, पुणे शहर शाखेने या दुर्लक्षित कुटुंबांना श्री. समस्त नामदेव शिंपी दैव मंडळ कसबा पेठ, पुणे  येथे रविवार दि. ९ ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी ५.०० वाजता सोशल डिस्टन्सींगच्या नियमांचे पालन करून राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्त आफळे महाराज व प्रसिद्ध शिल्पकार विवेक खटावकर, दगडू शेठ दत्त मंदिराचे विश्वस्त शिरीष मोहीते, ना.स.प.चे विभागीय उपाध्यक्ष संजय नेवासकर यांच्या हस्ते देवदासी, गोंधळी व पोतराज यांना धान्याचे ६० किट वाटप करण्यात आले. डाॅ.अजय फुटाणे सरचिटणीस ना.स.प., डाॅ.धर्माजी साठे अध्यक्ष पोतराज, अँड. ज्ञानेश्वर पाटसकर विश्वस्त ना.स.प., हणमंत शिंदे देवदासी सामाजिक कार्यकर्ते व सुरेश लसूणकुटे गोंधळी सामाजिक कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी गोंधळी सुरेश लसूणकुटे व सहकार्यानी नामदेव महाराजांचे जीवन कार्यावर कणव सादर करून कार्यक्रमाचा दर्जा आणि उंची वाढवली.तसेच ना.स.प. पुणे शहर अध्यक्ष संदिप लचके, सचिव सुभाष मुळे सर, उपाध्यक्ष प्रदिप खोले, कुंदन गोरटे, विशाल पोरे व रणजित माळवदे, खजिनदार अक्षय मांढरे, महेश मांढरे, मुख्य संघटक प्रशांत सातपुते, प्रसिद्धी प्रमुख अॅड.सागर मांढरे, राहुल सुपेकर, सल्लागार सुभाष पांढरकामे, रमेश हिरवे, गजानन सदरे व पदाधिकारी हजर होते. तसेच अॅड. प्रकाश शिंदेकर, रोहित यवतकर, दिंगबर क्षीरसागर, मिलिंद पाडळकर, अक्षय लचके, मनोज बारटक्के, दिनेश सुपेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे उत्तम सुत्रसंचालन सहसचिव मोहन खटावकर यांनी करून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले अशी माहिती नामदेव समाजन्नोती परिषदेचे समन्वयक गणेश हिरवे यांनी दिली आहे .

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट