सफाई कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर,मास्क,हॅँडग्जोज देण्याची स्थायी समिती अध्यक्षांचे प्रशासनाला आदेश

मुंबई (प्रतिनिधी): कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी पालिका मोठया हिमतीने लढत असून गेल्या दोन दिवसांपासून पालिका सफाई कामगार स्वच्छता राखण्यासाठी जो अविरत प्रयत्न करत आहेत त्यांचे कौतुक केले पाहिजे.त्याच बरोबर पालिका प्रशासनाने त्यांच्या व इतरांच्या सुरक्षेसाठी त्यांना सॅनिटायझर,मास्क,हॅँडग्जोज,तातडीने पुरवावेत असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रशासनाला मंगळवारी झालेल्या स्थायी समिती विशेष सभेत दिले.
कोरोना व्हायरसचा वाढत असलेला प्रार्दभाव रोखण्यासाठी पालिका प्रशासन प्रयत्न करत आहे.मंगळवारी तातडीने स्थायी समितीची बैठक बोलाविण्यात आली.यावेळी अनेक नगरसेवकांनी आपली मते मांडत पालिका प्रशासन कोरोना व्हायरस रोखण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले.आपण सर्वांनी मिळून या संकटाचा सामना करायला हवा असे सर्वपक्षीयांनी मत नोंदवत पालिका प्रशासनाचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न केला.पालिकेचे विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी देखील खाजगी रूग्णालयांना कोरोनाची टेस्ट करण्यासाठी परवानगी देण्यात यावी अशी मागणी केली.आयुकतांना अधिकार असल्याने त्यांनी त्याचा वापर करत रूग्णालयाच्या इमारती बंद आहेत त्या सुरू करून रूग्णांना सेवा दयावी अशी मागणी केली.नगरसेवक विजयेंद्र शिंदे यांनी कर्मचाºयांना आणि कोरोनाचा सामना करणाºया प्रत्येकाला मास्क,सॅनिटायझर दयावे अशी मागणी केली.नगरसेवकांचा निधी त्यासाठी वापरावा लागला तरी चालेल असे ते म्हणाले.नगरसेविका ज्योती अळवणी यांनी बेसिक स्वच्छता होत नाही अशी खंत व्यकत करून प्रशासनाने त्यावर अगोदर भर दयावा असे त्या म्हणाल्या.आरोग्य अधिकारी नगरसेवकांना सहकार्य करत नसल्याचा त्यांनी आरोप करून अशा अधिकाºयांवर कारवाई करावी अशी मागणी केली.विदयार्थ्यी सिंह,आसिफ झकेरिया,मकरंद नार्वेकर,सभागृह नेत्या विशाखा राउत यांनी पालिका प्रशासनाच्या कामाचे कौतुक करून त्यांनी हा लढा असाच दोन आठवडे सुरू ठेवावा अशी मागणी केली.

परदेशी नागरिकांना आवरणार कोण?
गेटवे ऑफ  परिसरात परदेशी नागरिक बिनधास्त फिरत असल्याचे दिसून येत असून त्यांना कोण आवरणार असा सवाल नगरसेविका सुजाता सानप यांनी स्थायी समितीत करून पालिका प्रशासनाचे यावर लक्ष आहे की नाही.नसेलतर त्यांनी देउन इतर नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी अशी मागणी केली.पालिकेचे अधिकारी आणि कर्मचाºयांनी परदेशी नागरिक अशा रितीने सर्रास फिरू लागले तर त्यांच्यावर नियंत्रण मिळवावे अशा त्या म्हणाल्या.

२४ डिसेंबर पासूनच काळजी घेतलीय
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव चीनमध्ये झाला तेव्हा पासूनच आपण दक्ष होतो. पालिकेने २४ डिसेंबर पासूनच याची काळजी घेतली होती.तेव्हापासून प्रशासकीस यंत्रणा सज्ज होती. मुंबई आणि महाराष्टÑात त्याचा फैलाव त्यामुळेच रोखला गेला आहे, असे अतिरिकत आयुकत सुरेश काकाणी यांनी स्थायी समितीत माहिती देतांना सांगितले.आपण या संकटाचा सामना करण्यासाठी प्रशासन आणि नगरसेवक यांनी कंबर कसली पाहिजे त्यासाठी ते प्रयत्न करत आहेत त्याबदल त्यांनी समाधान व्यकत केले.परदेशातून आलेल्या प्रवाशांचे विमानतळावर थर्मल स्कॅनिंग करण्यात येत असून कस्तुरबा रूग्णालयातील सेवा सक्षम करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट